Ration Card E Kyc Maharashtra Deadline : ज्या नागरिकांनी अजूनही त्यांच्या रेशन कार्डची ई-केवायसी (e-KYC) केलेली नाही, त्यांच्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, जर तुम्ही वेळेत केवायसी पूर्ण केली नाही तर तुमच मोफत रेशन मिळण बंद होऊ शकत.
भारत सरकारकडून अंत्योदय अन्न योजना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत देशातील सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत रेशन दिल जात आहे. पण आता इथून पुढे या योजनेचा लाभ मिळत राहण्यासाठी सरकारने 30 जून 2025 पूर्वी रेशन कार्ड ई-केवायसी करण बंधनकारक केल आहे.
Ration Card E Kyc – ई-केवायसी कशी करायची?
रेशन कार्ड ई-केवायसी प्रक्रिया अत्यंत सोपी असून तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन डीलरकडे जाऊन ई-केवायसी करू शकता. रेशन कार्ड ई-केवायसी करण्यासाठी रेशन कार्डधारकाला आपल रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन रेशन डीलरकडे जाव लागेल. तेथे POS मशीनमध्ये तुमच बायोमेट्रिक फिंगरप्रिंट घेण्यात येईल आणि तुमच नाव रेशन कार्डवरील माहिती तपासली जाईल. (कार्डावर नोंद असलेल्या सर्व सदस्यांच बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करण आवश्यक आहे).
फसवणुकीपासून सावध राहा
रेशन कार्ड ई-केवायसी संदर्भात सध्या अनेक फसवणुकीच्या घटना घडत आहेत. फसवणूक करणारे खोटे SMS, कॉल्स किंवा Apps च्या माध्यमातून तुमच्याकडून वैयक्तिक माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करू शकतात.
अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका.
कोणत्याही कॉलवर तुमची वैयक्तिक माहिती, OTP, आधार नंबर शेअर करू नका. सरकारी यंत्रणा अशा पद्धतीने कॉल करून वैयक्तिक माहिती विचारत नाहीत.
फेक अॅप्सपासून सावध राहा. ई-केवायसी फक्त अधिकृत पोर्टल किंवा स्थानिक डीलरमार्फतच करा.
सरकारचे आवाहन
खास करून ग्रामीण भागातील नागरिक, ज्यांना डिजिटल गोष्टींबाबत कमी माहिती आहे, त्यांनी फक्त आपल्या रेशन डीलरमार्फतच ई-केवायसी करावी. वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमच रेशन कार्ड तात्पुरत बंद होऊ शकत. त्यामुळ वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.
हेही वाचा : लाडक्या बहिणींना स्वतःची पतसंस्था सुरु करण्याचा मार्ग मोकळा! संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.