Fal Pik Vima 2025 Maharashtra GR : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे. “पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना” या योजनेअंतर्गत मृग बहार 2025 साठी द्राक्षे, लिंबू, संत्रा व पेरू या फळपिकांच्या विमा अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत आता 30 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
पूर्वी ही अंतिम मुदत 14 जून 2025 अशी निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक कारणामुळे अर्ज करता आले नाहीत. त्यामुळे केंद्र शासनाच्या सूचनांनुसार आता 17 जून 2025 पासून ते 30 जून 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील फळबागायतदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, या कालावधीत विमा कंपन्यांनी योग्य त्या प्रचार आणि जनजागृतीसाठी प्रयत्न करावेत. तसेच अर्ज प्रक्रियेत कोणताही गैरवापर टाळण्यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी होईल.
फळपीक विमा योजना (Fal Pik Vima Yojana) ही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीतून आर्थिक सुरक्षा देणारी महत्वाची योजना आहे. विशेषतः हवामानातील बदल, अवकाळी पाऊस किंवा गारपिटीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरते.
शेतकऱ्यांसाठी आवश्यक सूचना
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 जून 2025
अर्ज पद्धत: ऑनलाईन
लाभार्थी पिके: द्राक्ष, लिंबू, संत्रा, पेरू
अधिकृत GR: फळपीक विमा योजनेसाठी मुदतवाढ देणेबाबतचा GR.
महत्वाचे
ही योजना फक्त नोंदणीकृत व पात्र शेतकऱ्यांसाठी असून अर्ज करताना आपल्या पीक माहितीची अचूक नोंद करणे आवश्यक आहे.
हेही वाचा : लाडक्या बहिणींना 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज तेही 0% व्याजदराने.